Breaking

Illegal sand smuggling : भंडाऱ्यात वाळू तस्करांचा हैदोस, अधिकार्‍यांवर हल्ला!

Smugglers attack police that went for action : कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पाटलाला धक्काबुक्की

Bhandara भंडाऱ्यातील वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोहाडी तालुक्यातील खमारी गावात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि गावाच्या पोलीस पाटलाला वाळू तस्करांनी धक्काबुक्की करत थेट आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

मोहाडी तालुक्यातील खमारी गावाजवळील नदीपात्रात वाळूचा उपसा अवैधरित्या सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मोहाडीचे नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार आणि गावाचे पोलीस पाटील कुवरलाल दमाहे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाळू उपसा करत असलेल्या ट्रॅक्टर चालकासह काही व्यक्तींनी अधिकार्‍यांशी हुज्जत घालत त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टर घेऊन पलायन केले.

Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारवाईसाठी आलेल्या अधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्येही संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला घेराव घालून वाळूच्या अवैध वाहतुकीला लगाम घालण्याची जोरदार मागणी केली. गावकऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारची वाळू तस्करी गेल्या काही दिवसांपासून खुलेआम सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून केलेल्या कारवाया फोल ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाळू माफियांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mid day meal scheme : शाळेला सुटी, पण खिचडी शिजली!

भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांची वाढती दादागिरी ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच इतर ठिकाणीही अशाचप्रकारच्या घटना घडल्या असून, त्यावरून वाळू तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.