Pawar clarified stance, contest the elections in an alliance :पवारांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुका आघाडीत लढणार!
Baramati: राज्यात हिंदीचा वाद रंगला आहे. यातच शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. 60 टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे हिंदी भाषेचा द्वेष करू नये, मात्र सक्ती नको, असं ते म्हणाले. त्याचबरोबर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबाबत चर्चा सुरू असून, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त असल्याने त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयावरून वादंग सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. तसंच राज्यातील इतर राजकीय पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करावा, असं आवाहन केलं होतं. शरद पवार यांनी याबाबत बोलताना हिंदीची सक्ती असू नये, मात्र हिंदीचा द्वेष करणंही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही, असं मत व्यक्त केलं आहे.
Anti-Drug Awareness Week : ऑपरेशन थंडरअंतर्गत ७३० अटकेत, तर आठ कोटींचे अंमली पदार्थ जप्त !
शरद पवार म्हणाले की, ‘ हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. त्यामुळे पालकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावा, अशी व्यवस्था असावी,’ अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. तसंच
‘एक गोष्ट दुर्लक्षित करू नये की, या देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये. पण असं असलं तरीही हिंदीची सक्ती मात्र योग्य नाही,’ असंही पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी सुरुवात झाली असून या निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्रपणे लढणार की ‘एकला चलो रे’चा नारा देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली,
Bacchu Kadu : बच्चू कडूंना दिलासा नाहीच; अध्यक्षपदाच्या अपात्रतेवरील निर्णय २४ जूनला
याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. आमचा प्रयत्न हा राहील की, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेकाप आणि इतर छोटे पक्ष असे आम्ही सगळे एकत्र बसू आणि एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाता येतेय का, याबाबत चर्चा करू. एकत्र निवडणूक लढावी, अशी आमची इच्छा आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे. दरम्यान, ‘ मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या सगळ्यांच्यात मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईबाबत निर्णय घेताना त्यांना विचारात घ्यावं लागेल,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.