Breaking

Uday Samant : उदय सामंतांना आवडली कौस्तुभ आमटेंची शैली !

Uday Samanta liked the style of Kaustubh Amte : आनंदवनसारखे दोन टक्के जरी काम करू शकलो, तर बाबा आमटेंना श्रद्धांजली ठरेल

Warora Anandvan Chandrapur : बाबा आमटेंच्या आनंवनला आज (९ फेब्रुवारी) ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्याला व्यासपीठावर दोन आमटेंच्या मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बसता आलं, हे माझे भाग्य समजतो, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

आनंदवन येथील कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, आम्ही अनेक ठिकाणी स्कील सेंटर काढतो आहे. पण अशा ठिकाणी स्कील सेंटर काढायचं होतं. की त्याचा फायदा दिव्यांगांना नोकरी देण्यामध्ये होईल. आनंदवन येथे असे सेंटर सुरू करतो आहे. हे देशातील पहिलं सेंटर असणार आहे की, येथे दिव्यांगांना स्कील शिकवले जाणार आहे. आमच्या मंत्रालयाने प्रस्ताव मांडला आहे. माझ्या कुटुंबाचे आणि डॉ. विकास आमटे यांचे संबंध गेल्या १५ वर्षांपासून आहेत. त्यामुळे ही संधी मला मिळाली.

Devendra Fadanvis : आनंदवनात बालपणींच्या आठवणींमध्ये रमले मुख्यमंत्री !

व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आदीवासी कल्याण मंत्री अशोक उईके, माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोऱ्याचे आमदार करण देवतळे, वणीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, हेमंत पांडे, मिनाक्षी गुप्ता, CA रचना रानडे, डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, कौस्तुभ आमटे आणि आनंदवन परिवारजन उपस्थित होते.

डॉ. प्रकाश आमटेंचा राग..
डॉ. प्रकाश आमटे माझ्यावर रागावले आहे. कारण बोलावूनही मी हेमलकस्याला गेलो नाही. पण पुढच्या महिन्यात मी त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांचा राग शांत करणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार, हे निश्चित होते. पण ते येणार नाहीत, अशा वावड्या उठवल्या गेल्या. शंका निर्माण केली गेली. असे करणारे हितचिंतक आपल्या शेजारी-पाजारी असतात आणि ते असलेही पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Devendra Fadanvis : मुलभूत सेवा काय असते, हे समजून घेण्यासाठी आनंदवनलाच यावं लागेल !

कौस्तुभ आमटे यांची बोलण्याची, वागण्याची शैली मला खूप आवडली. कारण खुद्द मुख्यमंत्री कार्यक्रमाला आल्यानंतर आपली मागणी कशी लाऊन करायची हे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी एक-एक करून अशा पद्धतीने मागण्या ठेवल्या की, मुख्यमंत्री नाही म्हणूच शकणार नाहीत. ते सर्व मागण्या पूर्ण करतील, अशी खात्री मंत्री सामंत यांनी दिली. आनंदवनातील घरांचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, घरांची रचना उत्तम पद्धतीची आहे. असे आर्कीटेक्चर आनंदवनातच बघायला मिळतात.

जे आजवर कुणीही केलं नाही, ते आमटे कुटुंबीय करत आहेत. त्यामुळे माझाच काय सरकारचे सर्व विभाग त्यांना सहकार्य करतील. जे काम आनंदवनात होतं. तसं दोन टक्के काम जरी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करू शकलो. तर ती स्वर्गीय बाबा आमटेंना श्रद्धांजली ठरेल. या कामाला सरकारचे योगदान लागणार असेल तर तुमच्याच कुटुंबातील सदस्य म्हणून हातभार लाऊ. दोन्ही उपमुख्यमंत्रीही येणार होते. पण त्यांना शक्य झाले नाही. तुम्हाला राजाश्रय आहे, काळजी करू नका. तुमच्यासारखे काम करण्याची ऊर्जा आमच्यात येणार आहे. तुमच्या कुटुंबातले घटक म्हणून तुमच्या सोबत राहू, असे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले.