Breaking

Water crisis : मेहकरात नळ बंद; टँकरचे भाव वाढले!

No tap water in Mehkar for fifteen days : भीषण पाणी टंचाईचा सामना, पंधरा दिवसांपासून

Buldhana मेहकर शहरातील बालाजी नगरसह आसपासच्या भागात २७ एप्रिलपासून नळाद्वारे पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे. पाणीटंचाईचा फटका महिलांना आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. दुसरीकडे, खाजगी टँकरधारकांचे मात्र ‘चांदीचे दिवस’ सुरू झाले आहेत.

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही वीजपंप जळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र कोराडी प्रकल्पात अजूनही पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असूनही, यंत्रणांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Chandrashekhar Bawankule : ४२ एकर वनजमिनीवर डल्ला; अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

२ एप्रिलपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेकडे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचे संपूर्ण लक्ष केंद्रित झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाण्याच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी, संतप्त नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पाणीटंचाईने हैराण झालेल्या महिलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. “जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. “तातडीने नविन वीजपंप बसवून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा व कृत्रिम टंचाईतून सुटका करावी,” अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Operation Sindoor : देशाला न्याय मिळाला, सैन्याच्या पाठिशी उभे राहा!

सगळं लक्ष निवडणुकीकडे
राजकीय पक्षांचं सगळं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागलं आहे. त्यामुळे पाणी टंचाईवरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे.