Breaking

A threat to repeat the Beed incident : तुझा ‘मस्साजोगचा सरपंच’ करेन; धमकी देऊन मारहाण

राजकीय

बुलढाणा

Sarpanch’s husband beaten up for shutting down illegal activities : अवैध धंदे बंद केल्याने सरपंच पतीस मारहाण

Buldhana गावातील अवैध धंदे बंद करणे सरपंच पतीच्या जीवावर बेतले. गावातील अवैध धंदे बंद केल्याने पाच जणांनी सरपंच पतीस मारहाण केली. ही घटना 31 डिसेंबर राेजी संध्याकाळी कळंबेश्वर Kalambeshwar येथे घडली. याप्रकरणी जानेफळ पाेलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कळंबेश्वर येथील सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांना अवैध धंदे बंद का केले? म्हणून गावातीलच पाच जणांनी मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी कळंबेशवर येथील स्मशानभूमीत घडली होती. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी आरोपी गणेश शंकर भराड, आकाश गोविंद सपकाळ यांच्यासह तीन अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता.

Akola Politics : राजकीय पक्षांना नव्या नेतृत्वाचे वेध !

आराेपींनी मारहाण करून खुरद यांच्या खिशातून 1.27 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले हाेते. अवैध धंद्यांना विरोध करतो म्हणून मस्साजोगचा सरपंच करुन टाकण्याची ही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजिनाथ मोरे करीत आहेत.

सरपंच पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
याच प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून कळंबेश्वर येथील सरपंच पती सुभाष खुरद यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, सुभाष खुरद यांनी माझ्या सासू, सासऱ्यांना लाेटपाेट केली. तसेच माझा विनयभंग केला व साेन्याची पाेथ किंमत ९० हजार रुपये ताेडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Clash between two groups due to molestation of a married woman : विवाहितेच्या विनयभंगावरुन दाेन गटात हाणामारी!

सरपंचांवरील हल्याच्या घटना वाढल्या
बिड जिल्ह्यातील मस्साजाेग येथील सरपंच संताेष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. जिल्ह्यातही सरपंचांवरील हल्याच्या घटना वाढल्या आहेत. हत्ता येथील महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली हाेती. त्यानंतर आता कळंबेश्वर येथील सरपंचतीस अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून एवजही लंपास करण्यात आला. त्यामुळे, जिल्ह्यातील सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.