Raksha Khadse held a mirror up to the state government : आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का?
Nagpur : केंद्रातील, राज्यातील मंत्र्यांना कडेकोट सुरक्षा कवच असते. त्यांच्या कुटुंबीयांनाही ही सुरक्षा प्रदान केली जाते. अशाही परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलीची छेड काढली जात असेल तर याला काय म्हणावे? अशीच घटना राज्यात घडली आहे. या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही गुंडांनी छेड काढली. ही बातमी आज महाराष्ट्रातील वास्तव सांगत असल्याचे वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य लोकांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ करत असतील? किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल, हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.
Vijay Wadettiwar : आता संजीव कुमार राज्यसभेवर जातील की केंद्रात नियुक्तीवर ?
आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही. कारण गुंडांना महायुती सरकारचे राजकीय संरक्षण मिळते आहे. ‘लाडकी बहीण’चा उदो उदो करणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच मंत्र्यानी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.