Breaking

Bachchu Kadu : सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री १२ वाजता पेटणार प्रहारची मशाल !

 

Bachchu Kadu’s Prahar will be lit the torch in front of the houses of the ruling MLAs at 12 midnight : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रहार संघटना आक्रमक

Amravati : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आंदोलने म्हणजे भन्नाट असतात. आमदार असो किंवा नसो, सत्तेत असो किंवा सत्तेबाहेर जनतेसाठी आपल्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरायचे काम पडले तरी ते मागे हटत नाहीत. हे त्यांनी मागील काही वर्षांत दाखवून दिले. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते अनोखे आंदोलन करणार आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आज (११ एप्रिल) रात्री १२ वाजता मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. नाशिकमध्ये आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर स्वतः बच्चू कडू गळ्यात निळा दुपट्टा हातात भगवा झेंडा व मशाल घेऊन आंदोलन करणार आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडू विधान परिषदेत उतरणार?

तुमची वेळ केव्हा येणार ?
शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये पैसे नाही सांगता आणि तुमच्या सोईच्या सर्व गोष्टी मग ते मेट्रो असेल, विमानतळ असेल उभ्या करता. या सरकारला दिवसा शेतकरी दिसत नाही म्हणून रात्री मशाल घेऊन येऊ. आता तरी आम्हाला पहा, असे आव्हान बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. वेळ आल्यावर कर्जमाफी करू, असे काल (१० एप्रिल) महसूल मंत्री चंद्रशेखर बवनकुळे यांनी सांगितले. यावर तुमची वेळ येणार केव्हा, कुणाकडून मुहूर्त काढत आहात, असा खोचक सवाल बच्चू कडू यांनी केला.

Bachchu Kadu : हम चलते तो चिते की रफ्तार से, रोकने की तुम्हारी औकात नहीं !

पैसे नसतील तर आम्ही देतो..
पैसे नसतील तर आम्ही पैसे देतो. CWDM नावाची कंपनी 1 लाख कोटी कर्ज 5 वर्षांसाठी बिनव्याजी द्यायला तयार आहे. पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तुमची नियत आहे का, असाही सवाल त्यांनी केला. सातबारा कोरा करू, असे सांगत सांगत तुम्ही शेतकऱ्यांची मते घेतली. प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु. असं सांगितलं होतं. त्याचं काय झालं, असाही सवाल बच्चू कडू यांनी केला. आता प्रभू राम तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

आता तुम्ही पुन्हा प्रभू रामचंद्राची छपथ घेऊन सांगा की आम्ही अमूक दिवशी कर्जमाफी करू. नाही तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.