Breaking

Beed Incident Impact : 400 सरपंच धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर !

The sarpanch organization has struck a march on Collectorate Beed case : संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध; आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरपंच आक्रमक

Beed जिल्ह्यातील मस्साजोग येथील माजी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचवेळी खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद ईटवले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.

सकाळी 11 वाजता गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. संत तुकडोजी पुतळ्याच्या समोरून पोष्ट कार्यालय चौक, बसस्थानक समोरुन त्रिमूर्ती चौकात मोर्चा धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला जिल्हा सरंपच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

माजी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. ग्रामीण भागामध्ये सरपंचांना काम करणे कठीण झालेले आहे. सरपंच हा ग्रामविकासाचा कणा आहे. सरपंच यांना गावातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडवाव्या लागतात.

परिणामी काही लोकांशी विरोधही घ्यावा लागतो. त्यामुळे अनेक विरोधी लोक सरपंचांना पाण्यात पाहतात. ग्रामीण भागात सामाजिक व विकासात्मक काम करणे कठीण झालेले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व सरपंच अगदी तणावाखाली काम करीत आहेत. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असेलेले निवेदन सोपिवले.

Supply of fungal medicine to health centers : आरोग्य केंद्रांना बुरशीयुक्त औषधीचा पुरवठा !

मोर्चात जिल्हाध्यक्ष शरद ईटवले, पुरुषोत्तम रूखमोडे, शारदा गायधने, पारस भुसारी, आशिष माटे, मनोहर बोरकर, नंदकिशोर कावळे, जयराम (आशू) वंजारी, जयेश लांजेवार, रेशमा ईश्वरकर, बाबूलाल भोयर, भोजराज वैद्य, भूपेंद्र नागफासे, प्रमोद प्रधान, लीलाधर सोनवाने, परसराम फेंडरकर, देवेंद्र मेश्राम, धनश्याम पारधी, जगन वाघमारे, रुपेश आतिलकर, जयश्री सतदेवे, मेघा उईके, ज्योती नंदेश्वर, राजकिरण मेश्राम, जगन्नाथ वाघमारे, मेघा उईके, रामभाऊ मदनकर, विनायक टांगले, सहसराम कांबळे, गणेश मोथरकर, कुसुम कांबळे, चंदन वासनिक, श्रीरंग धुळसे, मंजूषा खंगार, मुलचंद ईश्वरकर, देवीदास ठवकर, स्वाती हुमणे, विद्या मेहर, पुरुषोत्तम कांबळे, प्रेमलाल तुमसरे, विलास बन्सोड, प्रदीप वासनिक यांच्यासह जवळपास 400 सरपंच उपस्थित होते.

या आहेत मागण्या..
संतोष देशमुख यांना न्याय देवून महाराष्ट्रातील सरपंचांना विश्वास द्यावा. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून 50 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. महाराष्ट्रातील सर्व सरपंच व लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करावी. ग्रामसभेला पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, तसेच सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास 353 कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा.