Breaking

Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !

 

MLA Sunil Shelke revealed the reason for the accident : मावळच्या दुर्घटनेत २०-२५ लोक वाहून गेल्याची भीती

Pune : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर २०-२५ लोक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. आता पूल कोसळण्यामागचे कारण पुढे आले आहे. एक चूक टळली असती, तर ही दुर्घटना घडली नसती, असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजिक इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील हा पूल होता. या अपघातानंतर वाहून गेलेल्या लोकांच्या कुटुबियांचा आक्रोश होत आहे. दरम्यान आमदार सुनील शेळके घटनास्थळी पोहोचलेले आहेत. बचावकार्यात ते स्वतः सहभागी झाले. एक चूक टाळली असती, तर हा पूल कोसळला नसता, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिकाऱ्यांशी संपर्क करून आवश्यक त्या सूचना दिल्या. राज्य सरकार आणि प्रशासनाने हा अपघात गांभीर्याने घेतलेला आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पादचारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्यानेच हा पूल कोसळला, अशी शक्यता आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली. लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही दुर्घटना घडली नसती, असं मला वाटतं, असे शेळके म्हणाले.

Gogawale ON Rashmi Thackeray : शिवसेनेच्या फुटीमागे ठाकरे ‘वहिणीं’चा हात !

प्रशासनाने एखाद्या ठिकाणी निर्बंध घातलेले असतील आणि त्यासाठी तसे फलक लावलेले असतील, तर ती व्यवस्था तोडून, नियमांचे उल्लंघन करून पुढे जाणे चुकीचे आहे. ते केव्हाही जिवावर बेतू शकतं. तशा सुचनाही प्रशासनाने जागोजागी फलकांवर लावलेल्या असतात. तरीही लोक ऐकत नाही, मग असे अपघात होतात. अशा स्थितीत प्रशासनाने काय केले पाहिजे, हा प्रश्न आता महत्वाचा ठरतो आहे.