Breaking

JEE Mains 2 : नियम किती कठोर असावे आणि कुणासाठी ?

 

Sahil failed the exam due to security guards of JEE MAIN exam in ION DIGITAL ZONE Nagpur : नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे परीक्षेला मुकला साहिल

Nagpur : आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीसाठी नियम – कायदे तयार केले आहेत. अगदी राज्यकर्त्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत. पोलिसांपासून ते चोरांपर्यंत. पण प्रत्येक नियमाचं प्रत्येक ठिकाणी पालन होते का, हा खरा प्रश्न आहे. पण आज ‘नियमाचे काटेकोर पालन’च्या नावाखाली एका गरीब विद्यार्थ्याला आयुष्यातील महत्वाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं.

आज (७ एप्रिल) जेईई मेन्स – २ ची परीक्षा (Joint Entrance Examinatation (Main) 2025 Session 2) होती. नागपुरातील हिंगणा-वाडी एमआयडीसी परिसरातील ION DIGITAL ZONE IDZ 3 हे एक परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर नागपूर शहरासह पूर्व व पश्चीम विदर्भाच्या इतर शहरांतीलही मुलाना परीक्षा द्यायची होती. Reporting Time दुपारी १ वाजता आणि शेवटचा प्रवेश दुपारी २.३० वाजता देण्यात येईल, असे प्रवेश पत्रावर स्पष्ट लिहीण्यात आले होते.

Board Exam : वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार करून मुलगा गेला दहावीच्या पेपरला!

प्रत्यक्ष पेपर सोडवण्याची वेळ दुपारी ३ ते ६ ही होती. दुपारी एक वाजतापासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची गर्दी परीक्षा केंद्रावर होऊ लागली. १ ते २.३० या वेळात जवळपास सर्वच विद्यार्थी केंद्रामध्ये प्रवेशकर्ते झाले. मोठ्या घरची मुले त्यांच्याकडील गाड्या घोड्यांनी तर मध्यमवर्गीय, गरीब घरची मुले ऑटो – रीक्षा आणि मिळेल त्या वाहनाने आली. यामध्ये दोन विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचायला केवळ १५ मिनीटे उशीर झाला.

केवळ पंधराच मिनीटे उशीर झाला. पेपर ३ वाजता सुरू होणार आहे. आम्हाला कृपया प्रवेश द्या. १५ मिनीटांत आम्ही सर्व प्रक्रिया करू. पेपर मिळायला ५-१० मिनीटे उशीर झाला, तरी ती आमची जबाबदारी. पण आम्हाला कृपया आत जाऊ द्या. ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आहे. अशी विनवणी दोन्ही विद्यार्थी करू लागले. पण नियमांचे काटेकोर पालन करणारे तेथील सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना पाझर फुटला नाही.

Board Exams : ७०१ केंद्रांवरील शिक्षक आणि कर्मचारी बदलले !

हा गोंधळ ऐकून तेथे जमलेले पालक सरसावले आणि १५ मिनीटं अद्याप शिल्लक आहेत. पेपर ३ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे मुलांना जाऊ द्या. बिच्चारे वर्षानूवर्षे या परीक्षेची तयारी करतात. इवलीशी चूक झाली, त्याची येवढी मोठी शिक्षा त्यांना देऊ नका. हवं तर आमच्यापैकी एकाला आतमध्ये जाऊ द्या. आम्ही व्यवस्थापनाला विनंती करतो. पण नियमांचे काटेकोर पालन करणारे तेथील सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारी काही केल्या मानले नाहीत.

Board Exams : सरकारची नवी योजना, ‘कॉपी करा, तुरुंगाची हवा खा!’

साहिल राजू उमाटे नामक मुलगा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथून आला होता. बस, ट्रेन, मेट्रो त्यानंतर ऑटो, अशी मजल दरमजल करत साहील एका मित्राला सोबत घेऊन आला होता. या सर्व प्रवासात त्याला केवळ १५ मिनीटे उशीर झाला. आणि नियमांच्या नावाखाली त्याला कठोर शिक्षा मिळाली. तेथेच सेंटरच्या गेटजवळ खाली बसून तो ढसाढसा रडला. पण कायद्याच्या रक्षकांना पाझर फुटला नाही. तेथे उपस्थित पालकांचे मन हळहळले. (शेवटी तेही आईवडीलच ना..) अखेर खिन्न मनाने तो मुलगा आपल्या मित्राला घेऊन माघारी परतला. उद्या या परिक्षेचा शेवटचा दिवस आहे. उद्या पेपर देता यावा, यासाठी तो प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांना यश मिळो, अशी प्रार्थना तेथे उपस्थित प्रत्येकाने केली.