Bulldozers are moving on the houses of terrorists in Jammu and Kashmir : ज्या भागांत दहशतवाद्यांचा वावर आहे, तो प्रत्येक भाग स्कॅन केला जात आहे
New Delhi : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला भारत सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तात्काळ बैठक गेऊन पाकिस्तानशी संबंध संपवले, पाणी थांबवण्यात आले. त्यानंतर सध्याही बैठकांचे सत्र सुरूच आहे. काश्मीरमधील प्रमुख जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोजर चालवून त्यांची घरे जमीनदोस्त केली जात आहेत.
२२ एप्रिलला झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर काश्मीरतील जनतेच्या भावना भडकल्या आहेत. ठिकठिकाणी मोर्चे काढून हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यात येत आहे. मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेणबत्त्या पेटवून प्रार्थना केली जात आहे. स्थानिक नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने दहशतवाद्यांची शोधमोहिम वेगवान केली गेली आहे. यादरम्यान काही ठिकाणी चकमकी उडत असल्याचीही माहिती आहे.
Kashmir terrorist attack : आज सायंकाळपर्यंत एकूण एक पाकिस्तानी परत जाणार !
गेल्या तीन दिवसांत शोपिया, पुलवामा येथील नऊ दहशदवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय तपास संस्था काश्मीरात दाखल झाल्या होत्या. त्यांतील एनआयएने काल तपास अधिकृपणे सुरू केला आहे. हल्ल्याच्या साक्षीदारांकडून माहिती घेतली जात आहे. त्यानुसार कारवाईची दिशा ठरवली जात आहे. दहशतवाद्यांच्या विरोधाताली कारवाईला आता वेग आला आहे.
Navneet Rana : नवनीत राणा म्हणाल्या, ‘एकवेळ बंदुकीची गोळी खाईन, पण…’
काश्मीरातील ज्या – ज्या भागांत दहशतवाद्यांचा वावर आहे, तो प्रत्येक भाग स्कॅन केला जात आहे. दरम्यान दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई केली पाहिजे, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. जनतेचीही हीच मागणी असल्याचेही थरूर म्हणाले.