Ensure strict implementation of liquor ban : अंमलबजावणी होतच नाही, खासदारांनी थेट अमित शहांची घेतली भेट
Wardha महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक वर्षांपूर्वी दारूबंदी जाहीर करण्यात आली. पण ही दारूबंदी केवळ कागदावरच आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही आणि आजही होत नाही. परिणामी वर्धा जिल्ह्यात दारूबंदी खरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत असतो. मात्र, आता खासदारांनी यासंदर्भात थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
गांधीजींचा सेवाग्राम येथील स्वातंत्र्यलढा लक्षात घेता आश्रमाचे पावित्र्य व पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात दारुबंदी झाली. मात्र, आज ७५ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच आहे. दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच निवेदनाच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे.
Bihar Politics : अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे गाजवणार बिहारचे राजकारण!
वर्धा जिल्ह्यात अगदी पानटपरीपासून, घराघरात दारूविक्री केली जात आहे. इतकेच नव्हे तर घरपोच सेवा देखील उपलब्ध करून दिली जात आहे. ही बाब गंभीर आहे. यामुळे व्यसनाधिनता, कौटुंबीक कलह वाढला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सक्तीने दारुबंदी लागू करण्याबाबत विनंती केली.
Malkapur Congress Meeting : ‘गद्दारांना बाजूला करा, नवख्या नेतृत्वाला संधी द्या!’
दारूबंदी असूनही वर्धा येथे इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारु उपलब्ध होते. इतकेच नाही तर वर्धा जिल्ह्यात तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त हातभट्टीची दारू निघते. बाहेरुन येणारी कंपनीची महागडी दारु पिणे परवडत नसल्याने गरीब वर्ग हातभट्टीच्या दारुच्या आहारी गेला आहे. विषारी दारुमुळे जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. कित्येक कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेमुळे मृत्यू झाल्याने किंवा व्यसनापायी हलाखीचे जीवन जगत आहेत. कित्येक मुलांचे छत्र गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. ही सर्व परिस्थिती खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर व्यक्त केली.