Breaking

Samruddhi Mahamarg : ५०० हून अधिक मृत्यू; जबाबदार कोण?

Include accident insurance in toll tax : समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये अपघात विमा समाविष्ट करा

Buldhana समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी अपघाती विमा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी ठोस मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना पाठवले आहे.

सावजी यांनी निवेदनात नमूद केले की, शासनाचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग हा प्रकल्प असला तरी आजवर या महामार्गावर तब्बल ५०० पेक्षा जास्त नागरिकांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. हे आकडे चिंताजनक असून महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था अपुरी पडत असल्याचे स्पष्ट होते.

महामार्गावरून प्रवास करताना टोलच्या माध्यमातून सरकारकडे मोठी रक्कम जमा होते. मात्र, प्रवाशांना कोणतीही विमा सुरक्षा दिली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सावजी यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रवास सुरू करताच संबंधित टोल बिंदूपासून अपघात विमा कवच लागू व्हावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.

MLA Randhir Sawarkar : खरीप हंगामात बियाणे-खतांचा काळाबाजार रोखा

सदर प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊन कारवाई करण्यात यावी व त्याबाबत माहितीही देण्यात यावी, असे सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Caste wise census : जातिनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक न्याय, हक्काची पुनर्स्थापना !

जीवघेणा वेग ठरतोय धोकादायक
समृद्धी महामार्गावरील वाहनांचा जीवघेणा वेग धोकादायक ठरतोय, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, वेग वाढलेला असताना वाहनांवरील नियंत्रण सुटणे, डुलकी लागणे आदी प्रकारांमुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे.