Breaking

Vidarbha Farmers : तर राज्यकर्त्यांना आपली घरं सांभाळणे कठीण होईल!

Farmers’ dissatisfaction is evident in the incident of attempting to set fire to MLA’s house : शेतकऱ्यांचा असंतोष टोकाला; बुलढाण्यातील घटनेने वातावरण चिघळविले

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. संजय कुटे MLA Sanjay Kute यांच्या घरावर डिझेल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी व शेतीचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप या घटनेतून अधोरेखित झाला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय असह्य झाल्याचा असंतोष व्यक्त केला जात आहे.

बच्चू कडू यांनी देखील शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसाठी मोझरी येथे आंदोलन केले. एखाद्या विषयाचा चारा टाकला असता त्यावर लोकांच्या असंतोषाचा व असमाधानाचा वणवा अधिकच भडकतो. जेव्हा शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाचा योग्य वेळेवर निपटारा केला जात नाही, तेव्हा असंतोषाच्या ज्वाला अधिकच पसरत जातात. अधिकाऱ्यांवरील विश्वास हरवतो व स्वतःचे प्रश्न मार्गी लावत नसलेल्या राज्यव्यवस्थेवरील असंतोष अधिकच वाढतो.

Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यांची दुरावस्था; शिवसेनेने दिला अभियंत्याला अल्टिमेटम

या असंतोषाचा असाच एक भाग म्हणजे बुलढाण्याची घटना होय. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा निखारा अधिकच धगधगू लागला आहे. हे उदाहरण छोटं असलं तरी राज्य सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शेतकरी असंतोषाचा योग्य वेळेवर विचार केला नाही, तर येणारा काळ अधिक अस्वस्थ असणार आहे.

जर असाच असंतोष असंतुलित पद्धतीने वाढत गेला, तर प्रत्येक सत्ताधारी आमदार व मंत्र्यांच्या घरासमोर शेतकरी आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी येईल. एक वेळ अशी येईल की सत्ताधाऱ्यांना स्वतःचे घर सांभाळणे कठीण जाईल आणि त्यावेळेस पश्चात्ताप करून काहीच साध्य होणार नाही.

Bacchu Kadu : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू अपात्र

त्यामुळे राज्य सरकारने शेतकरी असंतोषाचा योग्य वेळेवर विचार करून कारवाई करणं गरजेचं असून शेतकऱ्यांवरील अन्याय थांबविणे हीच राज्यातील शांती व सुव्यवस्थेसाठी एकमेव वाट असणार आहे.