Breaking

Chitra Wagh : शाळांसोबतच मैदानांवरदेखील हवे सीसीटीव्ही कॅमेरे !

 

MLA Chitra Wagh demands CCTV cameras in schools as well as in playgrounds : आमदार चित्रा वाघ यांची आग्रही मागणी

Mumbai : मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये मुलामुलींचे विनयभंग आणि लैगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये शाळेतील कंत्राटी कामगार, कर्मचारी दोषी आढळले. मात्र अशा प्रकरणात हे कर्मचारी आमच्या पे रोल वर नाहीत. ते आमचे कर्मचारी नाही, असं कारण पुढे करत शाळा घटनेची जबाबदारी झटकतात. त्यामुळे आता शाळांमध्ये आणि मैदानांवरही सीसीटीव्ही कॅमेरे हवे, असे आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी असे कृत्य केल्यावर शाळेवर कोणतीही कारवाई होत नाही. यापुढे असे होऊ नये, म्हणून आमदार चित्रा वाघ यांनी उपरोक्त मागणी सभागृहात लाऊन धरली. त्या म्हणाल्या, शाळेत पोहोचल्यानंतर गेटच्या बाहेर पडेपर्यंत विद्यार्थ्यांची जबाबदारी ही पुर्णपणे शाळेचीच पर्यायाने त्या संस्थाचालकांचीच आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात अशाप्रकारच्या घटना घडल्या तर त्या शाळेवर आणि संस्थाचालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज सरकारने करायलाच हवी.

Chitra Wagh : सुरक्षित स्वच्छतागृहे नसल्यास पेट्रोल पंप, हॉटेल मालकांवर होणार कारवाई !

महिला स्वच्छतागृहांसाठी QR कोड..
महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा राज्यभर उपलब्ध व्हायलाच हवी, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात केली. शौचालये पाहिजे म्हटल्यावर शासनातर्फे ती बांधून दिली जातात. मात्र त्यांच्या देखभालीचे काय? स्वच्छतागृहात स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा नसल्यास महिलांनी तक्रार कोणाकडे करावी, हा प्रश्न उरतोच. त्यांच्या मागणीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Shakti Act : शक्ती कायद्यासाठी रोहिणी खडसेंचा “दुर्गावतार”!

संपूर्ण राज्यभरात QR कोड तक्रार प्रणाली मुंबईसह राज्यभरात अस्तित्वात आणावी. तसेच ही QR कोड तक्रार प्रणाली ही स्थानिक बॉडींशी जोडली जावी. महिला तक्रार करण्यासाठी हा कोड स्कॅन करतील आणि आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेणे हे स्थानिक बॉडीना बंधनकारक असेल. राज्यात अशाप्रकारची प्रणाली निर्माण झाली तर इतर राज्यांसाठी महाराष्ट्र राज्य हे आदर्श ठरेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वच्छभारत अभियानाला AI ची साथ मिळेल, असेही आमदार वाघ म्हणाल्या.