MLA Sanjay Gaikwad in controversy again due to criticism of Uddhav Thackeray : संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काही तासांतच घेतला यू-टर्न
Buldhana बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उद्धव गटाच्या आंदोलनावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा बाप काढला. मात्र चूक लक्षात येताच काही तासांतच त्यांनी यू-टर्न घेत, “बाळासाहेब ठाकरे आमचेही बाप आहेत” असे स्पष्टीकरण दिले.
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर विविध आरोप होत आहेत. त्यामध्ये मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांची नावे आहेत. याशिवाय काही अन्य मंत्रीदेखील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांविरोधात काल शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावतीने राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काहींनी लुंगी-बनियन घालून आंदोलन केले, कोणी पत्ते खेळले, तर एकाने नृत्यही केले.
Zilla Parishad School : शिक्षण सुविधांसाठी आदिवासी पालकांचे ‘झेडपी’त ठिय्या आंदोलन
दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका करताना आमदार संजय गायकवाड यांनी विधान केले की, “उबाठा गटाच्या वतीने झालेले हे आंदोलन म्हणजे काहीच उरलेले नाही. त्यांना काही काम नाही, त्यामुळे ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय, उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही.”
या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला. यावर स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे वडील असले तरी विचाराने बाळासाहेब आमचेही बाप आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असेही त्यांनी सांगितले.
Uday Samant : कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते
आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर उद्धव सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनीही टिका केली आहे. बेताल वक्तव्य आणि चुकीच्या वागणुकीची कुणीही काॅपी करणार नाही असा टाेला त्यांनी लगावला. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या बापाने आर्शिवाद दिला आणि उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिल्याने या महाशयांना विधानसभेची पायरी चढता आली. आता हे आमदार म्हणतात कुणी १० जन्म घेतले तरी माझी काॅपी करणे जमणार नाही. पण बेताल वक्तव्य आणि चुकीची बेताल वागणुकीचीही कुणीही काॅपी चांगले माणसे करणार नाही, असेही शेळके यांनी म्हटले आहे.








